संताच्या सहवासात आलो आणि भक्त झालो, असे म्हणणारे अनेक भेटतात. भक्त होणं इतकं सोप आहे का?. शेगांवचे गजानन महाराजांच्या सान्निध्यात अनेक जण आले. पण काही सारेच भक्त झाले असे वाचनात व ऐकण्यात नाही. महाराज जेथे प्रथम दर्शनी परीक्षेला सामोरे गेले. तेथे त्या भक्तांची काय कथा. भक्तिची परम उच्चांकी पातळी गाठलेले ते भक्त होते.सर्वस्वाचा त्याग, विरक्त वृत्ती, उपाधी मानसन्मान विरहीत जीवन, फक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने श्रींची विश्वासाने सेवा आणि निर्मळ भाव, शुद्ध आचार विचार. त्यांचे दर्शन ज्यांना झाले असेल. त्यांना त्यांच्यातील सात्विक भाव आणि गजाननमय जीवनवृत्ती निश्चितच जाणवली असणार. खर्या भक्तीची परिसीमा ओलांडून परमेश्वराशी एकरूप झालेले ते पुण्यात्मे. बंकटलाल आगरवाल, दामोदरपंत कुलकर्णी, पितांबर शिंपी, भास्कर पाटील, सर्व पाटील बंधू, बाळाभाऊ, गंगाभारती, पुंडलिक भोकरे, बायजाबाई, गणेश आप्पा, रामचंद्र गुरव, जगूआबा पाटील, दत्तात्रय केदार, दुधाहारी बुवा, रामचंद्र पाटील,वज्रभूषण पंडीत अशी अनेक नावे घेता येतील. त्यांनी श्रींच्या सेवेत राहून भक्तीचा मळा फुलवला. गजानन स्वामींनी या सार्यांना सहजा सहजी शिष्यत्व बहाल केले नाही. तर परीक्षा घेऊन त्यांच्यातील षड्रिपु नष्ट केले. ही मंडळीही श्रींच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली कारण त्यांचा गजानन बाबांवर असलेला दृढ विश्वास. काही गोष्टी तर्कशास्राच्या पलिकडे असतात. तेव्हा तेथे असतो तो फक्त विश्वास आणि विश्वास. ह्या विश्वासावर श्रीं च्या सेवेचा ध्यास लागलेली मंडळी गजानन बुवांच्या नामस्मरणात दंग होताना पाहायला मिळतात. आजही मठ असो की मंदिर किंवा उपासना स्थळ येथे सेवेची दक्षिणा देणारे हवेत. योग्य मनूष्याच्या शोधात आजही महाराज आहेत. देश विदेशात श्रींची मठ,मंदिरे,उपासना केंद्रे स्थापन झाली आहेत व होतीलही. पण पाहिजे ती नारायण महाराजांसारखी पवित्र सेवा. खुद्द महाराजांनीच म्हटलंय, समर्थसेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना योग्य मनूष्य तुझ्याविना कोणी न येथे सांप्रत. आपणही श्रींच्या ह्या उपदेशाचा गांभिर्याने विचार करूयात आणि आजच्या काळातील सद्भक्त नारायणाला जवळ करूयात.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com