तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. शेगांवच्या स्वामी गजाननाने वज्रभूषण पंडीत यांना केलेला हा उपदेश. लिलावतारी हा सत्पुरूष मूळातच निस्वार्थ वृत्तीचा. त्यांनी चमत्कार केले. ते काही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धिसाठी नव्हे. तर समाजउपयोगी कार्यासाठीच. ईश्वर स्वरूप तो पुण्यात्मा. त्याच्या नामस्मरणाने सुद्धा आपली दुःखे, संकटे हरणार आहेत. मात्र त्याकरीता हवी दृढ इच्छाशक्ति आणि प्रबळ विश्वास. आजही श्रींचे अस्तित्व आहे. बेंबी देठापासुन त्यांना आर्त साद घालून तर पहा. मग बघा तूमच्याही आयुष्यात फुलेल नवचैतन्य ते. हं पण आपले प्रारब्ध आपल्याला भोगावे लागणार आहे. सुख दुःखाचे, आनंद निराशेचे सारे क्षण आपल्याला उपभोगावे लागणार आहेत. पण गजानन नावाने हा आयुष्यरूपी भवसागर तरुन जाण्यास मदतच होणार आहे. जेवढे नाम घेऊ तसे तसे संकटांचा सामना करण्याची ताकद गजानन आपल्याला देत राहतात. अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा अनुभव आहे. केवळ त्यांच्या छायाचित्राकडे पाहिले तरी समाधान आधार वाटतो. आज महाराज निर्गुण स्थितीत आहेत. पण त्यांचा वावर सर्वत्र आहे. जगभर त्यांना मानणारे त्यांच्यावर भावभक्तीने प्रेम करणारे असंख्य आहेत. अणूरेणूत चराचरात ते आहेत. म्हणून तर श्री गजानन विजय ग्रंथाच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. आपले नशीब चांगले म्हणून आपल्याला गजानन महाराज शेगांवी अवतरले हे तरी माहिती झाले. सगूण रूपात त्यांचे दर्शन झाले. त्यां भाग्यवंतांचे भाग्य थोर. आपण निर्गुण स्वरूपात तरी त्यांचे दर्शन घेऊ. मानस पुजेतून त्यांना आपली सेवा वाहू आणि म्हणू काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वामदेव याला दुसरी उपमा न ती द्यावया.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com