शेगांवचे गजानन स्वामींचे लिलाचरित्रातून अनेकविध विषयांवर त्यांनी केलेले भाष्य अभ्यासण्या सारखे आहेच. मुखत्वे करून कृतीत आणण्यासारखे आहे. सकारात्मक मानसिकता, व्यावहारीक चातुर्य, प्रपंच परमार्थ, नितीमत्ता, योग अध्यात्म अशा अनेक विषयांची उकल होऊ लागते. ३६६८ ओव्यांच्या ग्रंथात प्रत्येक ओवी गर्भितार्थ दडलेला आहे तो जाणवतोही. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी न वरी साधुसंत येता घरी विन्मुख त्याला लावू नये. अपमान खर्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा होतसे बापा साचा संतचरणी प्रेमा धरी. आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने सोयर्याधायर्या कारणे समयानुसार मान द्यावा. अशी अनेक उदाहरणे आहेत. श्री गजानन स्वामींची लिला अथांग सागरासारखी आहे. केवळ मर्यादित पुस्तकांतील ग्रंथातील माहिती च्या आधारे बोलणे, लिहिणे सोपे आहे. मात्र श्री गजानन या अंथांगसागराची महती जाणून घ्यायची म्हटले ते एका जन्मात शक्य होईल का? असे वाटणे हा आपला सामान्य मनूष्य स्वभाव. महाराज आजहि लिळारूपात असल्याचे लोक सांगतात. पण अनुभुती शिवाय प्रचिती नाही. मग अनुभूतीसाठी आपल्यालाही कष्ट घ्यावे लागतील. तेंव्हा कुठे रूपयातले एक आणे मर्म समजायला सुरूवात होइल. समजेल असेही नाही. किमान जाणिव व्हायला लागेल. असो. आपण सर्वसाधारण माणसे. षड्रिपूंनी ग्रासलेले. मूळ मनाच्या सात्विकतेत. सकारात्मक विचारसरणीत आहे. आपण फक्त नाम घेऊन श्रींस सतत हाक मारू शकतो. म्हणू शकतो, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जयराम जय जय राम, जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com.