परिचय गजाननाचा – भाग ४०

सध्याच्या जमान्यात अनेक स्वयंघोषित गुरू झालेले ऐकायला,पाहायला, वाचायला मिळते. त्यांच्यावर परीक्षा न विश्वास ठेवणारेही बहुसंख्य सापडतात. पण हिरा सुद्धा पारखून घेतात हो. शेगांवचे श्री गजानन महाराज असेच उच्चकोटीचे संत. त्यांचीही परीक्षा पाहीली. तेंव्हा कुठे त्यांना अनेकांनी गुरू केले आणि करत आहेत. त्यांच्यावर टिका करणार्यां भागाबाईने म्हटले होते, गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्तिपंथाते दाविता. ही सर्व लक्षणे स्वामी गजाननाकडे होती आणि आजही आहेत. परंतू भागाबाई सारख्...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३९

एक संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आन सत्य एक त्यांनाच कळे. आपले हित संतांना माहिती. एखाद्या संतावर टिका करण्यापेक्षा सत्य काय ते तपासून पहावे. शेगांवीचे श्री गजानन महाराज यांच्यावर अनेकांनी टिका केली. श्री गजानन विजय ग्रंथात त्याची उदाहरणे आढळतात. महाराजांच्या नावाखाली भक्त म्हणविणारे तेंव्हाही भांडले व आजही वादविवादाच्या फेर्यात काही जण अडकल्याचे दृष्टीस येते. विचारांचं परिवर्तन, आपल्यातील चूका, अमूक व्यक्ती पाहिजे तमूक नको अशा चूकीच्या कल्पनांपासून संतच आपल्याला परावृत्त करतील. का...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३८

अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनि गेली. शेगांवच्या श्री गजाननांनी बाळकृष्णबुवा रामदासी यांना दर्शन देण्याकरीता उच्चारलेला हा श्र्लोक. श्रीं च्या आणि समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनाने बाळकृष्णबुबांमधील संभ्रम नाहीसा झाला. सात्विकतेला सकारात्मक तेजाची जणू झळाळी मिळाली.अंगी निःस्वार्थता आणखीन विकसली. गजानन स्वामींनाच त्यांनी आपलं मानलं. पण तोच लक्ष्मण घूडे. त्याला स्वतःचा स्वार्थ आठवला म्हणून खजिन्याच्या उंबर्यावर जाऊन बसला. त्याच्यातला दूजाभाव पाहून महाराज त्याला म्हणाले,माझे माझ...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३७

सुख,समाधान,आनंदाची इच्छा तुम्हा आम्हा सर्वांची. अर्थात ही इच्छा असावीच.कारण हे जीवन सुंदर आहे. मात्र त्याकरीता व्यवहारीक नियोजन महत्वाचे. शेगांवचे श्री गजानन म्हणत, वेळ गेल्यावर कूप खणणे निरर्थक. कूप म्हणजे विहिर. तहान लागल्यावर विहिर खणण्यात काय तो शहाणपणा. अगोदरच नियोजन असावे. संसार करताना सुद्धा विचारपूर्वक करावा. अन्यथा जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपुन गेल्यावरी धन सहज होते न्याय हा.अशावेळी कोण मदतीला येतो. कोणी नाही. लोक स्वार्थाकरता जवळ करतात तसेच जवळ येतात. स्वार्थ झाला की जव...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३६

नैनं छिन्दन्ति शस्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारूतः भगवद्गीतेतला हा श्र्लोक. आत्म्याची माहिती देणारा.शस्राने आत्मा मरत नाही. अग्नि जाळू शकत नाही. पाण्यात भिजत नाही की वारा वाहून नेऊ शकत नाही. शेगांवच्या श्री स्वामी गजाननानं जळत्या पलंगावर बसून गीतेतलं वर्णन सिद्ध करून दाखवलं. शब्दपांडीत्य परंतू अनुभव शुन्य ब्रह्मगिरी गोसावी यांना वास्तवाचे भान आणून दिले. नैनं छिन्दन्ति श्र्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता कां मानिता दर ह्या पलंगी बसण्याचा.? ज्यांनी राख लावावी त्यांनी उ...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३५

संतांनी मनूष्यावर कृपा केलेली अनेक उदाहरणे पोथ्या,पुराणे,ग्रंथांतून वाचायला मिळतात. शेगांवच्या गजानन बाबांनी प्राणिमात्रावरही कृपा केली. गोविंदबुवा टाकळीकर यांचा घोडा शांत केला. तेंव्हा त्यांनी उच्चारलेल्या गणी गण गणांत बोते या मंत्राचा त्याच्या मनःपटलावर परिणाम होऊन व्दाडवृत्ती नाहिशी झाली. सुखलाल यांची गाय शेगांवात आली. तशी ही शांत झाली. तिचे साखळदंड स्वतःच्या हाताने श्रींनी काढले. तिला कायमची आपल्या सेवेत ठेवून घेतले. मठ स्थापनेवेळी बैलगाडीत बसलेले महाराजांना इच्छित स्थळी विनावाहक बैलांनी पोह...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३४

अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये.प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. शेगांवीच्या श्री गजानन स्वामींनी बंडूतात्या दंडे यांना केलेला हा उपदेश. बंडूतात्या सात्विक,सदाचारी वृत्तीचे ब्राह्मण होते. दानधर्म, पूजाअर्चा करण्यात त्यांना आनंद. मात्र प्रपंच करून परमार्थ साधायला हवा. आहे ते सारे देऊन कफल्लक होण्यात काय अर्थ आहे. साहजिकच कर्जबाजारी होणे. कर्ज फेडता न आल्याने भितीपोटी आयुष्य संपविण्याचा विचार करणे अय...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३३

निःस्पृहता किती असावी. हे संतांकडून शिकावे. रामदास स्वामी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईंबाबा, शेगांवीचे गजानन महाराज असे अनेक संत झाले. विरक्तीतून समाजहित जपणारे ते संत. त्यांना आवड ती खर्या भावभक्तीची. अकोल्याचे बच्चुलाल आगरवाल यांनी एकदा श्री गजाननाची मनोभावे सेवा केली. श्रींस वस्र अलंकार परिधान केले. आपल्या जवळ होते नव्हते ते सारं श्रींस अर्पण केलं. बच्चुलाल यांचा भाव शुद्ध होता. त्यांना राम मंदिर बांधायची इच्छा होती. स्वामींनी त्यांचा भाव ओळखला, जानकीजीवन तुझा हेतु पूर्ण करेल. असा आ...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३२

शेगांवचे गजानन महाराज. नरदेहधारी परमेश्वर तो. भक्तांच्या आर्त हाकेला धाऊन जाणारे संत. सद्भक्त भास्कर पाटील यांना कुत्रे चावले. त्या कुत्र्याचे विष अंगी भिनू नये. म्हणून कृपा केली. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर कूत्र्यांच्या विषापासून वाचण्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे. हेही सांगितले. श्रींच्यामुळे तेथे अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे. हे समजले. आजही ती वनस्पती तेथे असेल. संशोधक शोध घेतीलही. आपण असा विचार करूयात योग,भक्ती,वेदशास्रसंपन्न, विविध भाषा बोलणारे गजानन स्वामी विद्व...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३१

मन असता पवित्र सदासर्वकाळ वाचावे गुरुचरित्र. श्री गजानन विजय ग्रंथही मनापासून वाचावा, असाच प्रासादिक वाणीचा ग्रंथ आहे. मन आणि शरीराची शुचिर्भूतता प्रसन्नता देते. मात्र केवळ कर्मकांड करणे मनाची स्वच्छता नसणे. हे योग्य नव्हे. शेगांवला श्री गजानन बाबांच्या दर्शनाला आलेला एक कर्मठ ब्राह्मण. शरीर शुचिर्भूततेला महत्व देणारा. श्रीं च्या मठाबाहेरील रस्त्यात एक कुत्रे मरून पडलेले पाहून तो खिन्न झाला. संतापला थेट श्रींचे साधूपण जळो येथपर्यंत बोलला. श्रींनीच त्याच्या बुद्धिपटलावरील भ्रम नाहीसा केला. योगसाम...
Read More